मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

मैत्री

आज प्रथमच एक छोटीशी कथा लिहिणार आहे. माझ्या कल्पनेतली नाही, हि मी redio वर ऐकलेली आहे.
एक कार्यक्रम यायचा रात्री ९ वाजता FM चे नाव आठवत नाही पण त्या कार्यक्रमाचे नाव कधीही नाही विसरता येणार. "याद शहर" खूप सुंदर असायचा आणि तो RJ तर मस्तच.
अगदीच गुंगून ठेवायचा कथा सांगताना. आणि आता मी सांगणार आहे ती कथा खूप महत्वाची आहे माझ्यासाठी आणि योग्य वेळी मला ती ऐकायला मिळाली होती.
हि कथा आहे दोन मित्रांची रमेश आणि सुरेश यांची.

रमेश आणि सुरेश दोघेही लहानपणापासूनचे मित्र शाळेत असताना सुद्धा नेहमीच एकत्र असायचे, खेळताना एकत्र मधल्या सुट्टीतला डबा सुद्धा एकत्रच. खूप जपायचे एकमेकांना,
कोणालाही बडवायचे असेल तरीही एकत्रच अगदी जीवाभावाचे मित्र होते. दोघानाही क्रिकेट चे खूप वेड. एक होता तेज गोलंदाज तर दुसरा होता उत्कृष्ट फलंदाज. जस जसे दिवस जात होते तशी मैत्री अजूनच घट्ट होत होती.
दोघांच्या हि घरी त्याच्या मैत्रीबद्दल माहित होते. सर्वच छान सुरु होते. आता दोगेही कॉलेज ला पण जायला लागले होते. नवीन सर्व तरुण रक्त, जसे तारुण्यात मनात भाव असतात तसेच त्या दोघांच्याही मनात होते.
मुलींबद्दल आकर्षण .... पण कधी त्रास द्यावासा नाही वाटला दोघानाही, कुठच्याही मुली ला . त्यांच्या ह्या एकंदरीत वागण्यामुळे बर्यच मुली फिदा झाल्या होत्या. त्यातच दोगेही कॉलेज च्या क्रिकेट टीम मध्ये, आणि हे दोघे म्हणजे
सामना विजयी होणार हे सुद्धा नक्कीच. म्हणजे सांगायचेच झाले तर सर्व काही छान सुरु होते.
त्यातच रमेश ला प्रिया आवडू लागली होती. प्रिया म्हणजे कॉलेज ची जान होती, सुंदर ,सालस... सर्व पोर तिच्यावर जीव द्यायला तयार पण तिला मात्र कोणीच नाही आवडायचे. रमेश तिच्यावर खूप प्रेम करायचा पण तिला ते सांगायची त्याची कधी हिम्मतच झाली नाही.
प्रथम हि गोष्ट त्याने सुरेशलाच सांगितली. सुरेश सुद्धा खुश होता आणि प्रियाला पटवण्यासाठी रमेश ची मदत करत होता. दिवस जस जसे जात होते तसा रमेश पूर्णपणे प्रियामध्ये बुडून जायला लागला. पण प्रियाला त्याची जराही खबर नव्हती.
हळू हळू वर्ष संपत आलीत कॉलेज विश्वातून बाहेर पडायची वेळ जवळ यायला लागली होती. रमेश चे प्रेम तर खूप पुढे गेले होते, परंतु अजूनही त्याने प्रिया ला यातले काहीच सांगितले नव्हते. सुरेश ने बर्याचदा सांगूनही त्याचा धीराच झाला नाही प्रिया शी बोलण्याच्या,
आपले अव्यक्त प्रेम तिच्यापुढे ठेवण्याचा.
शेवटच्या परीक्षेच्या २ महिने अगोदर इंटर कॉलेज क्रिकेट सामने होते. आणि ह्याच्या कॉलेज मधून रमेश आणि सुरेश दोगेही टीम मध्ये होतेच. दोघांनीही सुरेख खेळ करत त्याच्या टीम ला अंतिम सामन्यापर्यंत आणले होते.
परंतु ह्या दरम्यान सुरेश नेहमीच थोडा अस्वस्थ असायचा, पण सामन्याच्या तयारीमध्ये रमेश ला हे कळले सुद्धा नाही.....

अखेर आज अंतिम सामना आला. सकाळपासूनच रमेश सामन्याच्या तयारीत होता. वेळ झाली तो मैन्दानावर आला. पण आज त्याचेही लक्ष लागत नव्हते, त्याची नजर सतत कोणालातरी शोधत होती. त्यालाच त्याच्या जिवाभावाच्या मित्राला सुरेश ला...
तो आज मैदानावर नव्हताच. चौकशी केल्यावर समजले कि अचानक काही कामामुळे त्याला गावी जायला लागले होते. पण ...
हा पण सारखा त्याच्या डोक्यात येत होता. कि असे की झाले आणि त्याला मलाही न सांगता गावी जावे लागले. संपूर्ण सामना तो ह्याच एक गोष्टीचा विचार करत होता. परंतु हाडाचा फलंदाज असल्यामुळे ह्या गोष्टीचा त्याच्या खेळावर मात्र काहीच परिणाम झाला नाही.
अजून एक उत्कृष खेळी करून त्याने स्वतःच्या कॉलेज ला विजयी करून दिले होते. आणि सामनावीर म्हणून पुरस्कार पण मिळवला होता. परंतु अजूनही तो सुरेश चाच विचार करत होता. त्याला काही प्रोब्लेम तर नाही न झाला. माझी गरज तर नसेल ना?...
दोन दिवस झाले सुरेश ची काहीच खबर नव्हती. फोन सुद्धा बंद होता. रमेश ला काही एक सुचत नव्हते. त्यात दोन दिवस त्याला प्रिया सुद्धा कॉलेज ला दिसली नव्हती. त्यामुळे तो अधिकच अस्वस्थ झाला होता.

रमेश चे लक्ष कशातच लागत नव्हते.... आणि अचानक त्याला कॉलेज मध्ये एक बातमी मिळाली. त्याने तर रेमेश्च्या पायाखालची जमीनच सरकली. सारे जग आजूबाजूला फिरू लागले. हळूहळू त्याचे डोकेही बधीर व्हायला लागले. कसाबसा तो घरी पोहोचला आणि आपल्या खोलीत
जाऊन मटकन खालीच कोसळला. त्याला मिळालेली बातमी अशी होती कि "सुरेश आणि प्रिया यांनी लग्न केले आहे आणि तेही पळून जाऊन ". काही दिवस असेच निघून गेले रमेश कोणाशीच काही बोलत नव्हता. त्याच्या घराचेही काळजीत होते. सतत सुरेश बद्दल विचार चालू होता त्याच्या डोक्यात.
अतिशय राग आला होता त्याला, त्याच्याच जिवाभावाच्या मित्राने त्याला धोका दिला होता. घट्ट मैत्रीच्या जागा आता सूड आणि त्वेष याने घेतली होती. रमेशने तर क्रिकेट खेळणे सुद्धा बंद केले होते. तो अचानक शांत झाला होता. पण कोणालाही त्याचे कारण समाजात नव्हते. त्याच्या वागण्यामध्ये पण कमालीचा बदल झाला होता. असाच एक महिना निघून गेला. रमेश त्यामधून थोडा सावरायला लागला होता पण सुरेश वरचा त्याचा राग जराही कमी झाला नव्हता. एकच गोष्ट रमेशच्या मानाने घेतली होती ती म्हणजे सुरेश ने केलेला विश्वास घात.

आता जेमतेम एक महिना शिलक राहिला होता परीक्षेचा, रमेशने हळू हळू का होईना अभाय्साला सुरुवात केली होती. आणि इथे सुरेश आणि प्रिया या दोघांनीही कॉलेज ला येणे सुरु केले होते. पण रमेश आणि सुरेश एकमेकांसमोर यायला धजत नव्हते. तसे म्हणण्यापेक्षा सुरेश ला खूप काही बोलायचे होते रामेह बरोबर पण तो परीक्षा संपण्याची वाट बघत होता.
आज शेवटचा पेपर होता आणि सुरेश खूप आधी पासून ठरून आला होता आज काहीही झाले तरी रमेश बरोबर बोलायचेच. त्याला सगळे सांगायचे. म्हणून आज जरा नेहमीपेक्षा लवकरच पेपर संपून तो कॉलेज च्या बाहेर रमेश येण्याची वाट बघत होता. तेवढ्यात त्याला प्रिया येताना दिसली. ती सुद्धा त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. म्हणाली "पेपर कसा होता ?" पण आज सुरेशचे लक्ष रमेश सोडून कशातच नव्हते. त्याने तिला फक्त छान म्हणून उत्तर दिले आणि घरी जायला सांगितले नाहीतर उगाचच हिला बघून रमेश अजून रागवायचा माझ्यावर म्हणून तो परत रमेश ची वाट बघत बसला.
बराच वेळ होऊन गेला परंतु रमेश काही त्याला दिसला नाही. एव्हाना सारे कॉलेज शांत झाले होते. सुरेश तसाच हताश होऊन तिथून निघतो तो थेट रमेश चं घरीच. पण तेथेही त्याच्या हाती काहीच लागत नाही. कारण रमेश कधीच दूर त्याच्या मामाच्या गावी निघून गेलेला असतो.
आता एका वेगळ्याच द्वंद्वामध्ये सुरेश अडकून जातो. त्याला रमेश ला समजावयाचे असते आणि तो जवळही नसतो, की करावे काहीच सुचत नाही त्यालाही खूप अपराधी वाटायला लागते. तो लगेच रमेश ला फोन करतो परंतु फोन सुद्धा बंद मिळतो. आता मात्र सुरेश पुरता हडबडून जातो. कारण त्याने एक जिवाभावाचा मित्रा गमावलेला असतो. खूप प्रयत्न करूनही त्याला रमेश पर्यंत पोहोचता नाही येत.

दिवस जाऊ लागतात दोगेही एका चांगला कंपनी मध्ये कामाला सुरुवात करतात, पण अर्थातच वेगवेगळ्या शहरात. आता तर सुरेश आणि प्रीयासुह्द्या दुसर्या शहरात राहायला आलेले असतात. रमेश अजूनही काहीच विसरू शकलेला नसतो. सुरेश वर त्याचा खूप राग भरलेला असतो. आता ह्या गोष्टीला ३ वर्षे उलटून गेलेली असतात. रमेश ला आता त्या कंपनी चा कंटाळा आलेला असतो तेच तेच काम तेच रुटीन म्हणून तो पुरता कंटाळून गेलेला असतो. म्हणून तो नवीन नोकरी साठी अर्ज करत असतो. मध्येच एकदा तो गावी आपल्या घरी सुद्धा जाऊन येतो. परंतु आता सुरेश्बद्दल सुद्धा कोणालाही काहीच माहित नसते. आणि जेव्हा तो परत शहरातल्या आपल्या घरी येतो तेव्हा एका पर्तिष्टीत कंपनी मधून त्याला बोलावणे आलेले असते.
रमेश ची जाण्याची तयारी सुरु होते. ईन्तेर्विएव च्या १ दिवस आधीच रमेश त्या शहरात्त जाऊन पोहोचतो. प्राथमिक फेरी पूर्ण होते. अर्थातच रमेश हुशार असल्यामुळे त्याला तसा काही त्रास नव्हताच. दुसरी फेरीही छान पैकी पार पडते. आता मात्र सर्वात कठीण फेरी असते.तो केबिन मध्ये प्रवेश करतो
तर समोर सुरेश बसलेला असतो. त्याला बघून प्रथम रमेश ला धक्काच बसतो . तो परत फिरणार इतक्यात अजून दोघे जन आता येतात. आता मात्र रमेश ला सुरेश समोर बसावेच लागते. सर्व काही सुरळीत पार पडते. आणि रमेश परत जायला निघतो तर त्याच्याचसाठी रिसेप्शन वर एक मेसेज ठेवलेला असतो. तो वाचून त्याला अजूनच राग येतो. मनातल्या कोपऱ्यात दडलेल्या साऱ्या भावना परत उफाळून येतात. पण सुरेशची शेवटची request म्हणून तो थांबायचं निर्णय घेतो.

थोड्या वेळातच सुरेश तिथे येतो आणि रमेश ला आपल्याबरोबर यायला सांगतो. रमेश चा संताप होत असतो परंतु तो शांत असतो, निदान दाखवण्याचा तरी प्रयत्न करत असतो. सुरेश रमेश ला आपल्या घरी घेऊन जातो.
सुरेश च्या घरात पाऊल पडताच मात्र रमेश चा स्वतः वरचा ताबा सुटतो. सरळ सरळ सुरेश चा गळा पकडून तो त्याला जाब विचारू लागतो. आत्ता मात्र सुरेश ला रमेश ची भीती वाटू लागते. पण त्यातही तो रमेश कडे एकदा बोलायची संधी मागतो.

तेवढ्यात रमेश ला लक्षात येते कि घरात प्रिया कुठेच दिसत नाही आहे. तेव्हा सुरेश बोलायच्या आधीच रमेश त्याला प्रिया बद्दल विचारतो.आणि बोलायला सुरुवात करतो. प्रिया जशी तुझी नव्हती कधी तशीच माझीही झाली नाही कधीच. त्यादिवशी अंतिम सामना असूनही मी आलो नव्हतो, आठवत असेल तुला. त्याला कारणच तसे होते. गावी माझे वडील खूप आजारी पडले होते. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. म्हणूनच मला तिथे लगेच जाणे गरजेचे होते. आणि तुही येशील माझ्याबरोबर माहित होते मला म्हणून तुलाही काहीच न सांगता निघून गेलो. कारण
कॉलेज ला तुझी गरज होती. रमेश च्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलत होते. आणि सुरेश पुढे बोलू लागला. गावी गेलो आणि बाबांना तसे बघून राहवलेच नाही. त्यांना या आधी कधीच असे झोपून राहिलेले बघितले नव्हते. आणि जेव्हा बाबांच्या जवळ गेलो तेव्हा त्यांनी त्यांची शेवटची इच्छाह बोलून दाखवली. म्हणाले मी आहे तोपर्यंत तुझे लग्न झालेले पाहायचे आहे नाही म्हणून नकोस. मी मुलगी सुद्धा बघून ठेवली आहे खूप सुंदर आहे. तुझ्याच कॉलेज ला आहे आणि माझ्या मित्राची मुलगी आहे. आम्ही आधीच ठरवले होते पण तुमचे कॉलेज पूर्ण होण्याआधी काहीच सांगायचे नाही असे ठरवले होते . पण बाला माझ्याकडे आता खूप कमी वेळ आहे तर कृपया नाही म्हणून नकोस. आणि मी लगेच त्यांना वाचन देऊन मोकळा झालो. कारण प्रथमच त्यांनी माझ्याकडे काहीतरी मागितले होते.
घरी आल्यावर मला त्या मुलीबद्दल समजले आणि काही काल मी सुन्नच होऊन गेलो. कारण दुसरी तिसरी कोणीही नसून ती प्रिया होती. काय करावे काहीच समजत नव्हते. बाबांना नाही म्हणून दिलेले वाचन मोडणार होतो. आणि हा बोलून तेव्हाच तुलाही दुरावलो होतो. की करावे काचीच समजत नव्हते. कोणाशीही बोलता पण येत नव्हते. तुझ्याशी बोलायला हि खूप भीती वाटत होती, वाटले तू समाजशील का मला? बाबा घरी आले आणि घाईत आमचे लग्न झाले. पुढे आम्ही दोगेही परत कॉलेज ला आलो. म्हटले तुझ्याशी एकदा बोलून तुला सर्व काही सांगायचे. पण तू भेटायला तयारच नव्हतास.
खूप वाईट वाटत होते माझ्यामुळे नकळत का होईना पण तुला त्रास झाला होता खूप मोठा. आणि त्याचे प्रयाचीत सुद्धा करायची संधी नाही दिलीस तू मला. खरच मला माफ कर......
आता मात्र रमेश पुरता नरमला होता त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागलेत. खूप काही गमावल्याचे दुख त्याला होत होते. आणि सुरेश ला सुद्धा माफी मागायची संधी मिअली होती. दोगेही आज खूप रडले. तेही कडकडून मिठी मारून. आज दोन जिवलग मित्रा परत एकमेकांना भेटले होते. बराच वेळ दोगेही एकमेकांची माफी मागत होते. हळूहळू दोगेही सावरले.खूप छान वाटत होते दोगांनाही. तेवढ्यात रमेशने पुन्हा प्रिया विषयी विचारले.आणि सुरेश बोलायला लागला कि एका वर्षातच आमचा घटस्पोट झाला. ती माझीही कधीच नाही होऊ शकली. तिचे दुसर्याच कोणावर प्रेम होते.
आणि ती निघूनही गेली. आता मात्र रमेश अजूनच वाईट वाटले कि आपण आपल्या मित्राला खूप चुकीचे समजले होते म्हणून. त्या दिवशी रमेश सुरेश च्या रूम वरच राहिला. आणि दुसर्या दिवशी आपल्या शहरात निघून गेला खूप काही मिळून परतल्याचा आनंद घेऊन.

काही दिवसातच त्याने सुरेश बरोबर कामाला सुरुवात केली नवीन कंपनी मध्ये. सर्व काही छान सुरु झाले पूर्वीप्रमाणेच दोनीही जिवलग परत भेटलेले. बर्याच दिवसांनी कंपनी ने एक क्रिकेट चा सामना आयोजित केला कि त्यामुळे सर्वांना कामातून थोडा विरंगुळा मिळेल म्हणून.
आज सर्व जन मैदानावर उभे होते अर्थातच रमेश आणि सुरेश पण होतेच त्यात.सर्व जन सामन्याची तयारी करण्यात गुंतले होते. आणि तेवढ्यात रमेशने सुरेश ला एक जोरात हाक मारून जवळ बोलून घेतले, आणि दूर एके ठिकाणी बोट दाखून म्हणाला ती दिसते आहे न लाल ड्रेस घातलेली ती माझी आहे .आणि जर परत तू मध्ये आलास तर सोडणार नाही! असे म्हणून दोगेही मनापासून हसतात........

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

पूर्ण न झालेला पहिला ट्रेक

तशी मला ट्रेकिंग ला जायची खूप इच्छा होती पण कधी जमलेच नाही.अचानक एक दिवस मला फोन आला कि आपण पिकनिक ला जायचे आहे तर तू येणार का? मी तर नेहमीच एका पायावर तयार असतो पिकनिक ला जायला. आणि मग आम्ही एकत्र भेटलो ठिकाण नक्की करण्यासाठी. अरे हा पण आम्ही कोण ते सांगितलेच नाही.तर मी स्वतः, जितेंद्र(जितु), ग्रेश एकत्र जमलो आणि ठिकाण नक्की केले आणि तेसुद्धा ट्रेकिंग ला जायचे. अशा ठिकाणी कि ज्याबद्दल कोणालाही माहिती नाही, ते म्हणजे
महाराजांचा गड - किल्ले राजमाची. लोणावळा आणि कर्जत यांच्या मधोमध असलेल्या कोंदिवडे गावाजवळ. बस नक्की झाली सर्व तयारी झाली.आणि तो दिवस उजाडला १८ जुलै २०१०.
आम्ही सर्व ५.३० ला दादर पूर्वेला स्वामीनारायण मंदिराजवळ भेटणार होतो. आम्ही सर्व मिळून २० जन होतो.
तर सुरुवात करूयात एका अविस्मरणीय अशा आमच्या ट्रेक ला.
नेहमीप्रमाणेच आम्हाला म्हणजे मी , जितु (management गुरु ), ग्रेश, दादा,आणि इतर. सर्वांना निघायलाच ५.३० वाजले. दादर ला भेटणारी मंडळी वेळेवरच येऊन पोहोचली होती. इथूनच आमच्या दिवसाची खराब सुरुवात झाली. आधीच निघायला उशीर त्यात ट्रेन पण उशिरा. मग काय बसलो वाट बघत ट्रेन ची बरोबर सकाळी ६.०० वाजता ची बोरीवली ट्रेन होती. इतक्यात कोण जाने आमचा पिकनिक गुरु उर्फ जितु म्हणाला 'be prepared for surprises' . आणि त्याचे बोलणे संपायच्या आतच आम्हाला फोन आला कि दादर स्टेशन च्या बाहेर आमची बस RTO ने पकडली आहे नो पार्किंग झोन मध्ये. शेवटी कसेबसे त्या संकटातून बाहेर पडलो...त्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे आमच्या बस चे परमिट संपले होते आणि चालकाकडे कडे परवाना पण नव्हता. म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही पुरते फसलो होतो. पिकनिक गुरूंच्या management चे तीन तेरा वाजले होते. पण आता तीच बस वापरण्याशिवाय पर्याय नव्हता, निघालो! प्रवासाला एकदाची सुरुवात झाली.पण भीती होतीच परत पकडलो गेलो तर सुटका नाही.
बरोबर ७.२५ ला आम्ही ठाण्याला पोहोचलो , तिथे आम्हाला अजून एक दुसरा ग्रुप येऊन मिळणार होता. त्या ग्रुप ने जरा वेळच काढला बस पर्यंत पोहोचायला.
त्यामुळे आम्हाला निघायला ८ वाजून गेलेत. मग निघालो ठाण्याहून driver तर फक्त बस चालवत होता त्याला कुठचाही रस्ता माहित नव्हता. त्यामुळे त्याने कल्याण भिवंडी मार्गे हळू हळू बस कर्जत न्यायला सुरुवात केली. मध्येच चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि निघाली आमची बस मजल दरमजल करीत.
--------------------------------------------------------------------------------------
तसे ठाण्याच्या ग्रुप बरोबर आम्हाला काही जमून घायला होत नव्हते.तरीही सर्व मस्ती मज्जा करने सुरु होते. आणि अचानक आमच्या driver ने एका मोटार बाईक वाल्याला हळूच बाजूने टक्कर दिली. झाले त्याला तसे लागले नाही कारण तो वेळीच सावध झाला म्हणून नाहीतर kay झाले असते विचारही नाही करू शकत. झाले की मग गावातले लोक एकत्र,आमची बस थांबविली, आणि सुरुवात केली driver ला मारायला....मग कसेबसे आम्ही त्या संकात्तातून वाचलो आणि driver ला पण वाचवले. आणि आमची बस पुढे निघाली. कर्जत जवळच आले होते. बाहेर चान वातावरण होते. sundar अशी हिरवळ पसस्रली होती. डोंगर रांगा तर अगदी ढगांनी वेधल्या होत्या ते दृश्य म्हणजे मनाला शांतता करणारे असे विलोभनीय असे दृश्य होते. हे पहा ते दृश्य......
------------------------------------------------
मजल दरमजल करीत पोहोचलो एकदाचे कर्जत ला. जवळ जवळ १० वाजून ४० मिनिटे होऊन गेली होती. तिथून पुढे एक फाटा कोंदिवडे गावाजवळ जात होता त्यामुळे आमची बस तेथे वळवण्यात आली. त्या फाट्या नजीक वाहनांची रहदारी सांभाळण्यासाठी एक पोलीस उभा होता. त्याने नेमके आमच्या बस ला हटकले आणि थांबण्याचा इशारा केला. पण बस थांबविली असती तर तो आमचा driver कसला, नेली बस तशीच पुढे, झाले परत एक नवीन संकट उभे ठाकले. त्या पोलिसाने मोटार बाईक वरून येऊन आमची बस थांबवायला लावली. परत तेच सर्व जे दादर स्टेशन ला झाले होते सकाळी सकाळी.. तिहे थांबलो तेव्हाचे दृश्य.


तसे लवकरच सटकलो तिथून बहुतेक आमच्या driver ला याची आता सवय झाली असणार. पुढे शोधात शोधात कोंदिवडे गावाजवळ आमच्या ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचलो. सर्वच तसे कंटाळले होते कारण सकाळ पासून जराही पाऊस नव्हता, आणि उशीर सुद्धा खूप झाला होता. मग आम्ही एक वाटाड्या बरोबर घेतला तशी आधी सर्व सोय आमच्या management गुरु यांनी केलीच होती. आणि सुरुवात झाली आमच्या आयुष्यातील पहिल्या वहिल्या ट्रेक ला. ती म्हणजे बरोबर दुपारी १२.०० वाजता , सर्व तसे कंटाळले होतेच कारण खूप उशीर झाला होता सर्व management चा बट्ट्याबोळ झाला होता. सुरुवातीचा काही वेळ फोटो काढणे(वेळ काढणे) यात गेला. जसे सर्वजन स्वतःला फोटोग्राफर समाजात होते तर काही स्वतःला हिरो म्हणून घेत होते.
कसेबसे हळूहळू राजमाचीचा डोंगर चढत जवळ जवळ अर्ध्या तासात आम्ही कोंढाणा लेण्यांकडे पोहोचलो. जाताना काढलेली काही छायाचित्रे टाकत आहे.
खूप सुंदर आणि नयनरम्य दृश्य पाहून मन सुखावत होते. ते वाहणारे झरे आणि लहान मोठे धबधबे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

ते लेण्यांकडचे विलोभनीय दृश्य पाहून एखाद्याचे पाय तेथे थांबले नाहीत तर नवलच. कड्यावरून कोसळणारे ते पाणी, आणि ते सुंदर असे नक्षीकाम, त्यावेळच्या कारागिरीची साक्ष देते. मग तेथेच सर्वांचे पाय रेंगाळले. तसा पाऊस आमच्यावर रागावलाच होता सकाळपासून त्यामुळे सर्वांनी त्या मंद अश्या धबधब्याखाली पावसाचा आनंद लुटायला सुरुवात केली. माझे तसे spl ट्रेकिंग चे बूट होते एकदम नवीन कोरे करकरीत.त्यामुळे ते भिजून खराब करायची अजिबात इच्छा नव्हती. तसे ते बाजूला ठेऊन जाऊ शकलो असतो. पण का कोण जाने भिजावेसे वाटलेच नाही. मग माझ्यातला फोटोग्राफर जागा झाला. मी मुद्दामहुन एक डिजिटल SLR घेतला होता. तशी वापरायची प्रक्टिस फक्त १० मिनिटांचीच होती. पण तेथे काही सुंदर छायाचित्रे काढण्याची संधी मला मिळाली.
मग थोडा वेळ त्या नैसर्गिक तुषारांमध्ये भिजून झाल्यावर आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. परंतु आमच्या बरोबर असणारे काही वयोवृद्ध मनसे आणि एक गलेलठ्ठ मुलगी ज्यांना वर येणे शक्य नव्हते ते तेथेच त्या लेण्यां पाशी थांबले. आता आमचा २० जणांचा ताफा १८ वर आला होता. त्यातही एक आजी आमच्या बरोबर गड चढायला तयार झाल्यात. मग आमच्या वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणे आम्ही जंगलाच्या रस्त्याने जायचे ठरवले. त्याच्या म्हणण्या प्रमाणे आम्हाला वर पोहोचायला ३ तास लागले असस्ते. तसे लेण्यांकडून निघायलाच आम्हाला १.३५ झाले होते. हळू हळू त्या कडे कपार्यान्मधून आणि काळ्या दगडांवरून रस्ता काढत आम्ही हळू हळू वर चढत होतो. मध्येच वाहणारे झरे आणि पावसामुळे निसरडे झालेले दगड आणि माती यातून हळू हळू रस्ता काढत आम्ही चालत होतो. त्यात तिथल्या जंगलातल्या माश्यांनी तर सर्वांची हलत खराब करून टाकली होती. सुदैवाने मला एकही माशी चावली नाही. तसा मला डोंगर चढायची आवड असल्यामुळे मी सुरुवातीला सर्वांच्या पुढे होतो. जसा जसा वेळ जात होता तशी तशी माझी शक्ती कमी कमी होत होती. आणि मी मागे मागे पडत चाललो होतो. त्यातच माझ्या पायामध्ये गोळा आला, आणि चालानेसुधा मुश्कील झाले. कसे बसे आम्ही मधल्या एक पाठरापर्यंत जाऊन पोहोचलो. तेथेच आम्हाला ३.१५ झाले होते. मग तेथे १० मिनिटे आराम करून थोडेसे फोटो सेशन करून आम्ही पुढे निघालो. त्यात तो ठाण्याचा ग्रुप आमच्यावर नाराज होता कारण त्यांना त्यांच्या दोन ट्रेकिंग साठी अपरिपक्व माणसांना खालीच सोडून यावे लागले होते.
मग पुढे आम्ही परत वर चढायला सुरुवात केली. आता अजून जास्त चालायची टाकत माझ्यात राहिली नव्हती. कारण पाय खूप दुखत होता (गोळा aalyamule). कसे बसे करत एकदाचे आम्ही वर पोहोचलो, वर म्हणजे गडाच्या पायथ्याला तेसुद्धा बरोबर ४.१५ वाजता. आता अजून गडावर जाऊन परत यायचे आणि तसेच खाली उतरायचे कोणालाही जमले नसते. म्हणून सर्वानुमते तेथेच आराम आणि जेवण उरकून परत फिरायचे ठरले. मग तेथेच एका घरात आम्ही आमचा तळ ठोकला. तेथे जेवण उरकून चहा पिऊन आराम करून होईपर्यंत ५.३० होऊन गेले होते. आता परत कसे जायचे याचा विचार सुरु झाला. आलो त्याच रस्त्याने जायचे तर तो जंगलाचा खच खालाग्यांचा रस्ता होता आणि निसरडा पण होता. तसे आम्ही मुले कसेतरी जाऊ शकलो अससतो पण आमच्या बरोबरच्या आजी त्यांना जमले नसते. आणि पावसाचे दिवस असल्याने,तसेच आम्ही २००० फुतान्च्यापेक्षाही उंच असल्यामुळे ढग आणि पावसाचा अंधार यामुळे ६ च्या दरम्यानच काळोख पडायला सुरुवात झाली होती. म्हणून मग आम्ही दूर लोणावळ्याला जायचा रस्ता पकडला.
आमची बस कोंदिवडे गावातच थांबली होती. त्यामुळे आम्ही driver ला गाडी लोणावळ्याला आणायला सांगितली. तर त्याला लोणावळ्याला यायचा रस्ता माहित नव्हता. आता झाली पंचाईत. खाली थांबलेली दोन मनसे बस मध्ये बसून होती. आधीच driver आणि बस च्या मालाकामुळे आमची ट्रेक खराब झाली होती. त्यामुळे सर्वांनी कंटाळून driver ला बस घेऊन जाण्यास सांगितले. आणि आम्ही त्या लोणावळ्याच्या रस्त्याने निघालो....
हा रस्ता तसा बर्यापैकी रुंद आणि चांगला होता. कि एखादी गाडी आरामात येऊ शकली असती. अगदी त्या गावापर्यंत. परंतु रिमझिम पडणारा पाऊस आणि ढग ,त्यात ते थंड आणि दमात हवामान यामुळे तो मातीचा रस्ता खूपच निसरडा झाला होता. त्यात कडेने पाणी वाहत होते. मध्येच एखादे डबके येत होते. त्यातून वाट काढत हळू हळू रमत गमत मज्जा करा आम्ही १३ जन चाललो होतो.
आता मनात येयील कि १३ जन कसे मी तर आधी १८ म्हणालो होतो. हा तर ते बाकीचे ५ जन ठाणा ग्रुप चे होते. आणि आम्ही वरून निघाल्यापासूनच त्यांच्या मनात काहीतरी सुरु होते... आणि एक गोष्ट ती म्हणजे ट्रेक ला जाताना घ्यायची काळजी कोणीही घेतली नव्हती. त्यात दादा म्हणजे जितु चा मोठा भाऊ त्याचे शूज फाटले. तेव्हापासून तो अनवाणीच चालत होता आमच्या बरोबर. पुढे काही अंतर चालल्यावर आम्हाला एक डोळे दिपून टाकणारे दृश्य दिसले आणि सर्वच त्याच्याकडे ओढले गेलोत.
तेथे काढलेले काही छान असे फोटो.
ते बघून तिथून परत निघूच नये असे वाटत होते. पण आमच्या कडे वेळ खूप कमी होता कारण आता ६.३० वाजून गेले होते, त्यामुळे तिथून निघणे आम्हाला भाग होते. काही अंतर चालतच समोरून एक मुलगा आमच्याच ग्रुप चा प्रतिक आमच्या कडे आला आणि लांबूनच ओरडत होता कि जपून चला खूप निसरडे आहे पुढे. तेवढ्यातच पावसाला सुरुवात झाली होती. त्याचे म्हणणे सर्वांपर्यंत पोहोचायच्या आधीच सचिन पाय घसरून त्या रस्त्यावर पूर्ण झोपला. सर्व कपडे चिखलाने बरबटले होते त्याचे.आणि मी बाजूलाच असल्यामुळे पटकन त्याने मला पकडले त्यामुळे माझा रेनचीतर पण खराब झाले. नशिबाने माझ्या नवीन ट्रेक च्या शूज मुले मी उभा राहू शकलो नाहीतर मीसुद्धा त्याच्याबरोबर चिखलात पडलो असतो.
मग सर्वजण कडेने हळू हळू चालत होतो, त्या कडेला सुद्धा एवढी भुसभुशीत माती झाली होती कि पाय ठेवला तर अर्ध्या फुट पेक्षा जास्त आता रुतत होता. त्यात आम्हाला अजून एक वाईट बातमी समजली कि ठाणा ग्रुप ने त्यांच्यासाठी गाडी बोलून घेतली होती. आणि ते निघायच्या आत आम्ही तेथे पोहोचलो. परंतु आम्हालाच वरून दोष देऊन ते गाडीतून निघून गेलेत. आता शिल्लक राहिलो होतो आम्ही एकूण १४ जन बरोबर होतो . ह्या सर्व गोष्टींमुळे आमचा सर्वांचा मूड थोडा खराब झाला होता. आणि चालण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आता जवळ जवळ ७.१५ होऊन गेले होते. आणि काळोख पडू लागला होता. त्यात आम्ही बर्यापैकी उंचावर होतो त्यामुळे आजूबाजूने नुसते ढग जात होते धुके पडले होते त्यामुळे १० फुटांवरचे सुद्धा दिसणे थोडे मुश्कीलच झाले होते. नशिबाने आमच्या १४ जणांमध्ये एकाला लोणावळ्याचा रस्ता माहित होता आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे अजून कमीत कमी ३ तास तरी चालावे लागणार होते. त्यात पाऊस सुद्धा सुरु झाला होता. आम्ही सर्व हळू हळू चालत होतो. मध्येच एखादा लहान खेकडा पायाकडून जात होता. माझे बूट एक छोटासा पाण्याचा झरा ओलांडताना पूर्ण पाण्यात गेले होते त्यामुळे ते ओले पाय बुटात घालून वरून मोजे सुद्धा पायाची वाट लागली होती. आम्ही चालत होतो हळू हळू. पुढे काय होते काहीच माहित नाही. फक्त त्या वाटाड्या प्रतिक च्या सांगण्याप्रमाणे आम्ही चालत होतो. थोडी मज्जा करत होतो थोडे घाबरवणे सुरु होते. आम्हा १४ जणांमध्ये ७ मुले, १ लहान मुलगा आणि ६ मुली होत्या.
हळू हळू अंधार खूपच दाट व्हायला लागला, आणि ते जंगल! आमच्या शिवाय कोणीही दिसत नव्हते. आता जवळ जवळ ८ वाजत आले होते. गर्द झाडी, जंगल, पाऊस त्यात पायाखाली चिखल, दगड, हळूच पायाजवळून जाणारे लहानशे खेकडे, बेडूक,आणि रातकिड्यांचा आवाज सारे काही एकदम थरारक होते.
त्यात आमच्या एकाच्याही मोबाईल ला रेंज नव्हती. अश्यातच आम्ही हळू हळू चालत होतो. एकमेकांच्या आधाराने, तरीही सार्वजन मज्जा करत होते. सर्वच खूप वेगळा अनुभव होता. आता मात्र पुढचे काहीच दिसेनासे झाले. तेव्हा लगेच टोर्च शोधायला सुरुवात झाली पण कसले काय कोणीही टोर्च आणली नव्हती. शेवटी एक मोबाईल मिळाला ज्याला टोर्च होती. त्याच मोबिले च्या उजेडात आम्ही सर्व जन चालत होतो. कोणीही हरवू नये म्हणून आमच्या वाटाड्या प्रतिक च्या सांगण्याप्रमाणे आम्ही २ जनाच्या जोड्या बनवल्या आणि एकमेकांना आधार देत चालू लागलो. प्रतिक च्या माहिती प्रमाणे अजून १ ते १.३० तास लागणार होता पण आम्ही असेच हळू हळू चालत राहिलो असतो तर अजून वेळ लागला असता यात शंका नाही. काही वेळात एके ठिकाणी जीतुच्या मोबाईल ला रेंज मिळाली तेव्हा मग सर्वांनी आपापल्या किंवा दुसर्याच्या मोबाईल वरून घरी फोन करून खुशाली कळवली. खरी गोष्ट कोणीही सांगितली नाही. सांगून सांगून सांगणार काय ? आमची कशी वाट लागली ते.
आता आमचा वेग अजून मंदावला होता दिवसभराचे चालणे यामुळे सर्वांचे पाय दुखत होते. जास्त चालायची ताकत कोणामध्येही नव्हती पण, त्या जंगलात थांबणे सुद्धा जमले नसते म्हणून सर्व हळू हळू चालत होतो.जवळ जवळ आम्ही अर्धा तासाहून जास्त चाललो त्या काळोखात. अचानक आम्हाला दूर कुठूनतरी दोन प्रकाश आमच्या जवळ येताना दिसले. थोड्या जवळ आल्यावर समजले को कोणीतरी दोन माणसे आमच्या दिशेने येत आहेत. सर्वांच्या मनात संमिश्र भावना निर्माण झाल्यात, ते येणारे नक्की कोण असतील? आणि एवढ्या रात्री ते उलट दिशेने का येत आहेत. काळोखात काहीच समजेनासे झाले होते. शेवटी आम्हीच धीर करून त्यांच्या जवळ गेलो, तेव्हा समजले कि ते गावातलेच आहेत आणि परत घरी चालले आहेत काम उरकून. मग मदतीसाठी त्यांनाच शेवटी आम्ही विचारले. आणि ते लगेच तयार पण झालेत मदत करायला. मग आम्ही त्यांच्या ओळखीने एक टाटा सुमो घेतली आणि त्यातून निघालो. पण निघताना त्यांचे आभार मानूनच निघालो. कारण अजून चालणे झालेच नसते. शेवटी त्या सुमो मध्ये आम्ही १४ जन आणि त्याचा चालक होतो.
मग त्या सुनसान रस्त्यावर सुमो मधून जाताना आमच्या गप्पा रंगायला लागल्यात. त्यात सुमो चा चालक पण सहभागी झाला. तेव्हा त्याने जे सांगितले ते ऐकूनच आमची पाचावर धारण बसली. तो म्हणाला कि अजून जर काही वेळ तुम्ही चालत राहिला असस्तात तर सकाळ पर्यंत इथेच फिरत राहिला असता कारण रात्री इथे चकवा नावाचा भुताचा प्रकार फिरतो. आणि तुम्ही तर नवीन आहात त्यामुळे पटकन तुम्हाला त्याचा त्रास झाला असता. म्हटले वाचलो आम्ही आणि सुटकेचा निश्वास सोडला. आणि गाडी सुद्धा त्या खडकाळ रस्त्यावरून हळू हळू चालत होती. शेवटी पोहोचलो एकदाचे आम्ही लोणावळा बस स्थानकावर. कोणामध्येही अजून चालायची काय तर उभे राहायची ताकत सुद्धा नव्हती. आणि खूप भूक पण लागली होती, म्हणून मग आम्ही एस. टी. महामंडळ च्या उपहारगृहात गेलो. मग तिथेच सर्वांनी पेट पूजा केली. नन्तर बाहेर येऊन सर्वच जन एस. टी. शोधात होते मुंबई ला जाणारी. परंतु एकही एस. टी. मध्ये बसण्यासाठी जागा नव्हती. आणि उभे राहून ते ४ तास प्रवास करणे कोणालाही शक्य नव्हते. आणि आता ११ वाजून गेले होते. बराच वेळ वाट पाहून सुद्धा एकही बस मिळत नव्हती कि ज्यामध्ये बसायला जागा मिळेल अशी.शेवटी १२ च्या नंतर शेवटी आम्ही ट्रेन ने जायचे ठरवले. तर समजले कि १२.४० ला पहिली ट्रेन आहे मुंबई ला जाणारी. मग काय सर्वांनी फलाटावर झोपून दिले,काही बसले काही उभेच होते. पण आता सर्वांना कधी घरी पोहोचू असे झाले होते. एकदाची ट्रेन आली परंतु तिच्यात खूप गर्दी असल्यामुळे आणि एका रेल्वे अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आम्ही ती ट्रेन सोडली. पुढे लगेचच १० मिनिटात दुसरी ट्रेन आली आणि आम्ही सारे तिच्यात बसून मुंबई च्या परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही ठरवल्याप्रमाणे रात्री १० पर्यंत सर्व घरी पोहोचणार होतो, परंतु आता चक्क आम्हाला ४ वाजले दादर ला पोहोचायला.त्यानंतर एकमेकांच्या भेटी घेऊन पुढच्या पिकनिक ची तयारी करून सर्व आपापल्या घराकडे वळले.
तर आता आम्ही परत दिवाळीमध्ये जाणार आहोत पिकनिक ला.तर येणार असाल तर त्वरित संपर्क साधावा. माझ्या दूरध्वनीवर.
धन्यवाद!

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

आठवण


एका खूप प्रिय व्यक्ती साठी खूप आधी लिहिलेली...
फक्त तिच्याच साठी!


आज आठवतो परत तेच तेच क्षण,एकत्र घालवलेले,
आज आठवतो परत स्टेशन वर तुझी तासन तास वाट बघणे
आणि मी रागावतो समजले कि मग येण्याचे त्रास सांगून माझ्यावरच रागावणे
आज आठवतो परत ती पहिली भेट, तो रविवार आणि माझे उशिरा येणे.
तुला उशीर झालेला असतो खूप पण तुझ्या नंतर माझे येणे कारण करून माझ्यावरच रागावणे.
आज आठवते पहिल्या भेटीची ओढ आणि भेटण्या आधीची कासावीस.
आज आठवतात ते क्षण एकत्र घालवलेले.

आज आठवतात मोबाईल घ्यायचे कारण आणि परत एकत्र भेटणे
आणि मग पावसानेही दिलेली ती सुन्दर साथ.
रस्त्याच्या कडेला एकाच छत्रीतून चालताना होणारा स्पर्श.
तुझ्या मिठीसाठी आसुसलेले मन आणि तुला सावरताना भरून आलेले मन.
गुदाघाबर पाण्यात चालताना मला बिलगलेली तू, खूप कमी भेटीत तुझा विश्वास कमावलेला मी.
आज आठवतात ते क्षण एकत्र घालवलेले.

आज आठवते ती दिवसाप्रमाणे जागवलेली रात्र आणि
आम्हालाही साथ देण्यासाठी रेंगाळलेली रात्र.
एकमेकांच्या भेटीसाठी आसुसलेले मन.
आणि भेटल्यावरती कासावीस झालेले मन....

आज आठवता आहेत ह्या सर्व गोष्टी....

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

शेवटची भेट


आज शेवटचे भेटायला ये म्हणतेस मला,
भेटायला सुध्हा तीच जागा भेटली तुला,
जिथे पहिल्यांदा भेटायला आली होतीस .....

आज ही मी नेहामीप्रमानेच लवकर,
आणि तू नेहामीप्रमानेच उशिरा...
नेहमीच तू उशीर करतेस म्हणुन त्रागा करणारा मी
आणि आज तू येयुच नयेस म्हणुन प्रार्थना करणारा मी।

शेवटी आलीस एकदाची , पण पुर्वीसारखी नव्हतीस
मीही कुठे राहिलो होतो पुर्वीसारखा शेवटची भेट जनवताना॥

क्षणभर थांबलीस , माहित आहे तुला काही बोलता येत नव्हते
आणि मला काही एकायाचे ही नव्हते

शेवटी बोललीस नेमके तेच जे एकयाचे नव्हते
जसे शब्द कानावर पडत होते,मन माझे तुटत होते

आज कधी नव्हेत ती तुज्याकडे बघण्याची हिम्मतच होत नव्हती
आणि नजर तुज्या पयांवारून हटत सुद्धा नव्हती...

ते नाजूक कोमल पाय, आणि लाली लावलेली बोटे
खूप सुंदर भासत होती...
या आधी कधी पाय बघायची वेळच आली नव्हती,
कारण कधीच तुझ्या चेहऱ्यावरून नजर हटली नव्हती.

तू बोलत होतीस, मी नुसता उभाच होतो
तुझ्या बरोबर असतानाही एकटा पडत चाललो होतो.

डोळ्यात अश्रू दाटले होते,आणि शब्द ओठांआड गडप झाले होते
तू मात्र अखंड बोलत होतीस,तुटलेलं मन माझे अजून तोडत होतीस..

अचानक सर्व काही शांत झाले, काळच थांबल्याचा भास मला झाला
जेव्हा माझ्या हातांना तुझ्या कोमल हातांचा स्पर्श झाला...
माझ्याकडे एकदा तरी बघ म्हणत अचानक तुझा आवाज आला,
पायाकडची नजर तुझ्या चेहऱ्याकडे वळली,
प्रथमच तुझ्या प्रेमाची किंमत मला कळली..

पटकन दोन मोतीबिंदू माझ्या ओंजळीत पडले,
इतके वर्ष जे कधीच नाही सांडले.

शेवटचे काहीच न बोलता निघालीही ती गरकन वळून,
शेवटची ती भेट माझ्या ओंजळीत ठेऊन
मी मात्र तसाच उभा होतो शेवटपर्यंत
त्या पाठमोर्या आकृतीकडे आशेने बघत
आपल्याच नशिबावर हसत
शेवटची ती भेट सावरत...

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

कधी कधी.......


कधी कधी
जुनी डायरी उघडताच, आतून डोकाऊन बघतेस
वर मन करताच, दूर निघून गेलेली असतेस.

कधी कधी,
चांदण्या रात्री, मागून येऊन डोळे घट्ट मिटते
आणि उघडायचा प्रयत्न करताच, सकाळ झालेली असते.

कधी कधी,
दूरच्या प्रवासात, अचानक बाजूला येऊन बसते
हात हातात घेताच, सीट रिकामीच भासते.

कधी कधी,
समुद्र लहारीन्प्रमाणे, किनारी बागडताना दिसतेस
जवळ जाताच लाटांप्रमाणे निघून गेलेली असतेस.

कधी कधी,
स्वप्नांमध्ये हि येते, घट्ट मिठी मारते
ती मिठी सोडवताना मात्र, उशीच फाटलेली असते.

कधी कधी
कधी कधीच कशाला तू तर नेहमीच बरोबर असते
....................., माझ्या मनात कायमचीच वसते.

नेहमी हे असेच का होते?


नेहमी हे असेच का होते?
काहीतरी होणार वाटताना ,
भलतेच घडून बसते
सर्वच अपेक्षांवर पाणी फिरते.

कुणीतरी अचानक खूप जवळचे वाटते,
अमाप आनंद देते, आणि
नेमके हवेहवेसे असतानाच एकटे करून जाते.
नेहमी हे असेच का होते?

आयुष्यातल्या चुकांची जाणीव, मरणाच्या दारातच का होते,
मरण येते आहे म्हणून प्रायश्चित्त हि घेणे राहून जाते.
नेहमी हे असेच का होते?

कितीही जाणून घायचा प्रयत्न केला, तरी काहीतरी राहूनच जाते.
बहुतेक हेच आयुष्य असते, आणि ते असेच जगायचे असते.
नेहमी हे असेच का होते?

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

तू नसतेस न बरोबर...


काय सांगू,
हल्ली झोपच येत नाही
आता तर स्वप्न हि पडत नाहीत पूर्वीसारखी
हल्ली रात्री पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत
कारण, तू नसतेस न बरोबर.............

हो,पण असतात त्या आठवणी
हृदयाच्या कोपऱ्यात हळुवारपणे जपलेल्या,
करतात त्या सोबत अलीकडे
दिवसा, रात्री,कायमच
पण तुझी सर मात्र त्यांना येत नाही
कारण, तू नसतेस न बरोबर........

शेवटी आठवणीच त्या,
चांगल्या वाईट भूतकाळाच्या
हो,पण मला मात्र चांगल्याच आठवणी येतात तुझ्या
तुझे ते गोड हसणे,मला सतावताना खोडकर हसणे,
रात्री सारेच असस्ते डोळ्यांसमोर
पण, तू नसतेस न बरोबर........

हल्ली घेतो त्या आठवणींनाच कुशीत
बोलतो मग त्यांच्याशीच तू समजून
देतात परत ते सारे सुंदर क्षण
पण त्या वेळेची सर त्यांना येत नाही,
कारण, तू नसतेस न बरोबर....
मंदार सावंत २०/९/१० १२:१५

प्रिये

हळूच प्रिये तू येऊन जा,
कानात काही गुणगुणून जा..

वाऱ्याच्या झुळूकीप्रमाणे,
सहवास तुझा तू देऊन जा..

सुंदर मादक गंध तुझा,
मागे सुगंध तू ठेऊन जा..

दर्वळूदेत सभोवतालचे सारे,
धुंद मला तू करून जा..

तुझ्या पैजणांची रुणझुण,
हलकेच चाहूल देऊन जा..

रात्री मन माझे कावरे बावरे,
स्वप्नात मला तू घेऊन जा..

स्वर्ग वाटे सभोवती सारे,
तुझे असणे तू देऊन जा..

अश्रू दाटले आठवणीत सारे,
तयांची वाट मोकळी तू करून जा..

पुन्हा एकदा तू भेटून जा..
भेटून जा........................

२३/८/१०

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०११

भांडण!

आज खूप एकटे एकटे वाटतंय, दूर काळोखात लपून रहावेसे वाटतंय
जसे पौर्णिमेच्या रात्री चंद्र आहे, पण तोही एकटा एकटा वाटतोय.
रात्र काही केल्या संपत नाहीय, आणि दिवस पण हळू हळू चालू आहे
मनामधले प्रश्न मेंदूतल्या उत्तरांशी द्वंद्व खेळत आहे.
शेवटी मेंदू च जिंकत आहे , आणि मनही त्यापुढे नतमस्तक होत आहे
उत्तर फक्त एकच मिळत आहे, विश्वास थोडा दल्मालतो आहे.

माहित आहे तिलाही त्रास होत असेल,तीही दिवस रात्र तळमळत असेल
पण माझी जखम खूप खोल आहे, ती तिला दिसत का नसेल?

कोणासाठी कधीतरी....


ती गेल्यानंतर पडलो होतो एकटा.
वाटले सारे आयुष्याच घेऊन गेली.
राहवत नव्हते एकटे, न बोलावत होते
रडून डोळे सुजलेले,
पण पाणी त्यातले आटलेले.
आलीस अचानक आयुष्यात,
आणि आयुष्याच बनून राहिलीस.
सुरुवातीचे भांडण नंतर झालेले प्रेम
सारेच काही न तुला कळले न मला कळले.

जिच्यासाठी लिहिलेले तिला खूप आवडलेले आज लिहितो आहे इथे तुमच्या समोर.
तिच्या परवानगीशिवाय Sorry!

थोडेसे माझ्याबद्दल

आज बरेच ब्लोग वाचून मलापण परत लिहावेसे वाटायला लागले आहे, त्याचीच हि सुरुवात बघू कंटाळा न करता किती दिवस लिहू शकतो.तर तसा मी बऱ्याच आधीपासून लिहितो आहे. पण काय करणार कंटाळा दुसरे काय म्हणूनच सर्व अर्धवट राहून जाते.तर मला स्वतः काहीही करायला कंटाळा येतो. मला स्वतःलाच समजत नाही कि मी काय काय करू शकतो ते, इतरांनी सांगितले तरच मला समजते तर असा आहे मी.
लिहायची सुरुवात पण तशीच झाली. मध्ये काही कारणामुळे डायरी लिहायला सुरुवात केली. आधी कशी लिहायची तेच नाही समजत होते, मग दिवसा प्रमाणे काहीतरी खरडायला सुरुवात केली.मग परत कंटाळा म्हणून परत बंद.मग एका मैत्रिणीने सांगितले कि तू कसा आहेस ते काही समजत नाही. आणि तुला ओळखणे खूप कठीण आहे. मग काय झाली लगेच कॉलर टायीत. आणि हो ती सुद्धा खूप छान लिहिते. तिची कवितेची डायरी पण मी वाचली आहे.तेव्हा ती म्हणाली कि तू सुद्धा असेच लिहित जा मनातले जे वाटेल ते. मग त्रास नाही होत. म्हणून मग केली सुरुवात काहीतरी वायफळ लिहायला. दिसेलच तुम्हाला पुढे ते. ...
त्यानंतर बरेच दिवस काही न काही लिहिले जे वाटले जे भावले जे अनुभवले ते. मग परत बंद आता परत एका मैत्रिणीने सांगितलं तू लिही मला वाचायचे आहे तू छान लिहितोस.( बर हि मैत्रीण दुसरी बर आधीची नाही )
आणि साम्य म्हणजे हीसुद्धा खूप छान लिहिते मी एक तिच्या लिखाणाचा चाहता आहे असे समजा. तर तिच्या सांगण्यावरून मी आता परत लिहायला सुरुवात करतो आहे. एकंदरीत काय तर मला काहीतरी करायला दुसर्याकडून सांगितले गेले पाहिजे तरच मी ते करतो.
तर थोडासा असाच काहीसा आहे मी!