
नेहमी हे असेच का होते?
काहीतरी होणार वाटताना ,
भलतेच घडून बसते
सर्वच अपेक्षांवर पाणी फिरते.
कुणीतरी अचानक खूप जवळचे वाटते,
अमाप आनंद देते, आणि
नेमके हवेहवेसे असतानाच एकटे करून जाते.
नेहमी हे असेच का होते?
आयुष्यातल्या चुकांची जाणीव, मरणाच्या दारातच का होते,
मरण येते आहे म्हणून प्रायश्चित्त हि घेणे राहून जाते.
नेहमी हे असेच का होते?
कितीही जाणून घायचा प्रयत्न केला, तरी काहीतरी राहूनच जाते.
बहुतेक हेच आयुष्य असते, आणि ते असेच जगायचे असते.
नेहमी हे असेच का होते?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा