गुरुवार, २० ऑक्टोबर, २०११

थोडेसे माझ्याबद्दल

आज बरेच ब्लोग वाचून मलापण परत लिहावेसे वाटायला लागले आहे, त्याचीच हि सुरुवात बघू कंटाळा न करता किती दिवस लिहू शकतो.तर तसा मी बऱ्याच आधीपासून लिहितो आहे. पण काय करणार कंटाळा दुसरे काय म्हणूनच सर्व अर्धवट राहून जाते.तर मला स्वतः काहीही करायला कंटाळा येतो. मला स्वतःलाच समजत नाही कि मी काय काय करू शकतो ते, इतरांनी सांगितले तरच मला समजते तर असा आहे मी.
लिहायची सुरुवात पण तशीच झाली. मध्ये काही कारणामुळे डायरी लिहायला सुरुवात केली. आधी कशी लिहायची तेच नाही समजत होते, मग दिवसा प्रमाणे काहीतरी खरडायला सुरुवात केली.मग परत कंटाळा म्हणून परत बंद.मग एका मैत्रिणीने सांगितले कि तू कसा आहेस ते काही समजत नाही. आणि तुला ओळखणे खूप कठीण आहे. मग काय झाली लगेच कॉलर टायीत. आणि हो ती सुद्धा खूप छान लिहिते. तिची कवितेची डायरी पण मी वाचली आहे.तेव्हा ती म्हणाली कि तू सुद्धा असेच लिहित जा मनातले जे वाटेल ते. मग त्रास नाही होत. म्हणून मग केली सुरुवात काहीतरी वायफळ लिहायला. दिसेलच तुम्हाला पुढे ते. ...
त्यानंतर बरेच दिवस काही न काही लिहिले जे वाटले जे भावले जे अनुभवले ते. मग परत बंद आता परत एका मैत्रिणीने सांगितलं तू लिही मला वाचायचे आहे तू छान लिहितोस.( बर हि मैत्रीण दुसरी बर आधीची नाही )
आणि साम्य म्हणजे हीसुद्धा खूप छान लिहिते मी एक तिच्या लिखाणाचा चाहता आहे असे समजा. तर तिच्या सांगण्यावरून मी आता परत लिहायला सुरुवात करतो आहे. एकंदरीत काय तर मला काहीतरी करायला दुसर्याकडून सांगितले गेले पाहिजे तरच मी ते करतो.
तर थोडासा असाच काहीसा आहे मी!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा